रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत पंखाप्रमाणे हवेत हात हलवून नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. 'गडयांनो.. पतंग उडवूं चला' म्हणत आकाशात उडवलेले रंगी-बेरंगी पतंग; 'बहु असोत सुंदर संपन्न.. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण शालेय अभ्यासक्रमातल्या काही कविता मात्र आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून कुठेतरी खोलवर आपल्या मनात त्या घर करून बसलेल्या असतात.

शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हेच कळत नाही. आपण त्यांना 'लढ म्हणा...' नाहीच केवळ 'ओळखलंत का सर मला....' इतकेच विचारू शकतो. साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यानी अभ्यासलेल्या अशा काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व जुन्या कविंना हा मानाचा मुजरा...!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुचना:

ह्या ब्लॉगवरील प्रकाशित कविता बालभारती/कुमारभारती पाठ्यपुस्तकातील असून, मी त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर करत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमातून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क बालभारती/कुमारभारती/युवकभारती, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून केवळ रसिक-वाचक, अभ्यासक यांना मराठी अभ्यासक्रमातील कविता एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे. येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास त्या काढून टाकल्या जातील. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. एखादी कविता किंवा काही माहिती हवी असल्यास कॉपी पेस्ट न करता त्याच्या लिंकचा उपयोग करा किंवा तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवे असलेले साहित्य आम्ही तुम्हाला जरुर मेल करू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

स्वागत आहे !

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

Wednesday, December 14, 2011

नलराजा आणि हंस (भाग २)


(उपेंद्रवज्रा)
तया वनी एक तटाक तोये
तुडुंबले, तामरसानपाये
निरंतरामंद मरंद वाहे
तपांतही यास्तव रिक्त नोहे ll १३ ll

(द्रुतविलंबित)
अमृतही पयही म्हणवितसे
उभय होय तसी रुचि वितसें
मधुर सारस तें जल गा तसें
मधुर सारस यास्तव गातसे ll १४ ll

(वसंततिलका)
पीतां मरंद उदरंभर बंभराचें
जें होय मंदिरही सुंदर इंदिरेचें
जें पद्म तेथिल सहस्र-दळा धरी तें
प्रत्यक्ष सूर्यकिरणांस विसाववीतें ll १५ ll

(दिंडी)
तया कासारी राजहंस पाहे
राजहंसाचा कळप पोह्ताहे
तयासाठी हे वापिकाच पोहे
नळे केली हें कोण म्हणे नोहे ll १६ ll

तया हंसांचे देह कांचनाचे
पक्ष झळकती वीज जशी नाचे
रंग माणिकसे चंचुचे पदांचे
जसे अधरीचे भीम-कन्यकेचे ll १७ ll

(वसंततिलका)
त्यांतील एक कलहंस तटीं निजेला
जो भागला जल-विहार विशेष केला
पोटींच एक पद, लांबविला दुजा तो
पक्षीं तनू लपवी भूप तया पहातो ll १८ ll

टाकी उपानह पदें अति--मंद ठेवी
केली विजार वरि डौरहि, मौंन सेवी
हस्ती करी वलय उंच अशा उपायीं
भूपें हळूच धरिला कलहंस पायीं ll १९ ll

(मालिनी)
कलकल कलहंसे फार केला सुटाया
फडफड निजपक्षीं दाविलें कीं उडाया
नृपतिस मणि--बंधी टोंचिंता होय चंचू
धरी सुदृढ़ ज्या तो काय सोडील पंचू ll २० ll

तदितर खग भेणें वेगळाले पळाले
उपवन-जल केली जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशीं नसे तो
कठिन समय येतां कोण कामास येतो ll २१ ll



- रघुनाथ पंडित

इथे पाठ्यपुस्तकातील निवडक वेचे एकत्र करून तीन भागांत विभागून दिलेले आहेत त्यांतील हा दुसरा भाग आहे.

0 comments: